Breaking News

12 तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर , 24 तासात 39 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

12 तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर

Ø 24 तासात 39 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

चंद्रपूर,दि. 22  जून :  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असून जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी तब्बल 12 तालुक्यात मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात जिल्ह्यात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर सात जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच एका बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

बाधित आलेल्या 7 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0 , नागभीड 0, सिंदेवाही 0, मूल 0, सावली 2, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यामध्ये राजुरा तालुक्यातील 1 महिलेचा समावेश आहे.

             जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 574 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 446 आहे. सध्या जिल्ह्यात 609 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 39 हजार 546 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 52 हजार 616 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1519 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपूर,दि. 22  जून :  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असून जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी तब्बल 12 तालुक्यात मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात जिल्ह्यात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर सात जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच एका बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे.

बाधित आलेल्या 7 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 0, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0 , नागभीड 0, सिंदेवाही 0, मूल 0, सावली 2, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 1, कोरपना 0, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. आज मृत झालेल्यामध्ये राजुरा तालुक्यातील 1 महिलेचा समावेश आहे.

             जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 574 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 446 आहे. सध्या जिल्ह्यात 609 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 39 हजार 546 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 52 हजार 616 नमुने निगेटीव्ह आले आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत 1519 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *