Breaking News

नागपुरात पावसामुळे 4 मृत्यू

Advertisements

नागपूरमध्ये 22 सप्टेंबरच्या रात्री जोरदार पावसामुळे शहर पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. कित्येक गुरे पुरात वाहुन गेली आहे. कित्येक नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या. तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या पुरात तीन मृत्यू झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Advertisements

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुकानांचे जे नुकसान झाले त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत करणार आहोत. तर छोट्या ठेल्यांना 10 हजारांची मदत देणार आहोत. काही ठिकाणी पुल नव्याने बांधणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

Advertisements

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत दोन मृत्यू झाले असून पुन्हा एक बॉ़डी सापडली आहे. 14 जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. शिवाय 10 हजार लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. काही लोकांना बाहेर शिफ्ट करावे लागले आहे. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामे करून तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये देणार आहोत. त्यासोबत महापालिका गाळ काढण्यास कार्यवाही करणार असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. अतिशय कमी वेळात 109 मिमी पाऊस पडला. 90 टक्के पाऊस दोन तासात पडला. त्यामुळे अंबाझरी ओव्हरफ्लो झाला. त्यातूनच नाग नदी, पिवळी नदीत पूरस्थिती निर्माण झाली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *