Breaking News

भाजप-शिंदे सेना सरकार कसं बनविणार? वाचा

Advertisements

“निकाल लागल्यानंतर आम्ही सर्वजण पाहू की आम्ही महायुती म्हणून सरकार बनवू शकतो का? किंवा गरज पडली तर आम्ही अपक्षांना बरोबर घेऊ आणि सरकार बनवू. तसंही निवडणुकीत १० ते १५ अपक्ष निवडून येण्याची शक्यता आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांच्या या विधानाच्याआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनीही सरकार स्थापन करण्यासंदर्भात मोठं विधान केलं होतं. त्यामुळे सध्या निकाल जाहीर होण्याच्या आधीच पडद्यामागे राजकीय घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Advertisements

 

संजय शिरसाट काय म्हणाले?

Advertisements

शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही सरकारस्थापनेबाबत सूचक विधान केलं. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले गेले नाही आणि त्यांना दुय्यम भूमिका निभावावी लागली तर काय करणार? असा प्रश्न संजय शिरसाट यांना टिव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले, “यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील.” तसेच निकालानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार यांच्याबरोबर गेले तर? असा प्रश्न विचारला असताना संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “एकनाथ शिंदे यांनी कोणताही निर्णय घेतला तरी आम्ही त्यांच्याबरोबरच जाऊ.” दरम्यान, त्यांच्या या सूचक विधानाची सध्या मोठी चर्चा रंगली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *