विश्व भारत ऑनलाईन :
भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होते, ते काही धनदांडग्यांनी मिळून लाटले. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून दोषीवर कडक कारवाई करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता ते बोलत होते.
जिल्ह्यात धान घोटाळा झाला आहे. बोगस माल एफसीआयला देण्यात आला. शेतकऱ्यांचीही फसवणूक करण्यात आली. मागील सत्ताधाऱ्यांच्या चेल्याचपाट्याने मिळून हा भ्रष्टाचार केला, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. त्यांना सोडणार नाही. तर, भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करू, असेही फडणवीस म्हणाले.