Breaking News

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. आलगोंदी येथे पळसाच्या झाडावर वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अलगोंदीच्या पोलीस पाटलाने दिली.

 

काटोल तहसीलमधील कोंढाळी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आलागोंदी गावात गोविंदराव पंचभाई यांच्या घरी शेतात रविवारी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मोर्शी तालुक्यातील उदखेड येथील भागतराव भोंडवे (५०) आणि मध्य प्रदेशातील प्रभातपट्टण येथील जयदेव मनोटे (५५) आलगोंदी येथे आले होते.

दरम्यान दुपारी जोरदार वादळी पाऊसाला सुरूवात झाली. पावसापासून बचावासाठी काही जण शेतातील शेतातील पाळसाच्या झाडाखाली उभे होते. नेमकी त्याच झाडावर वीज कोसळली. त्यात भागवतराव भोंडवे आणि जयदेव मनोटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. रविवारी शहरातही दुपारपासून ढगांनी आकाशात गर्दी केली होती. तापमानातही घट नोंदवली गेली.

About विश्व भारत

Check Also

प्रेयसीचा खून करून नागपुरजवळील रामटेकच्या जंगलात पुरला मृतदेह

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह नागपूरजवळील जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी …

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक : नागपुरात खळबळ

महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या ऑडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *