औरंगाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका बड्या सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाखांची लाच घेतना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
ऋषिकेश देशमुख असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद येथे जलसंधारण विभागात आठ लाख 53 हजारची लाच घेताना देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. देशमुख हे वैजापूर जलसंधारण विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
कारण काय?
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांना सापळा रचून अटक केली आहे. जलसंधारण विभागातील हा अधिकारी बिलाची टक्केवारी घेताना रंगेहात पकडला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विश्वभारत News Website