नागरिकांच्या खिशाला पुन्हा महागाईचा झटका मिळण्याची शक्यता आहे.मुंबईतील तिन्ही वीज कंपन्यांची प्रस्तावित दरांबाबतची सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणीत सहभागी झालेल्यांना आता 23 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येतील. त्यानंतर 1 एप्रिलपासून प्रस्तावित दर लागू होण्याची शक्यता आहे.
वीज वितरण कंपन्यांची पंचवार्षिक वीज दरनिश्चिती 1 एप्रिल 2020 पासून झाली. तिसरे वर्ष संपताना या पंचवार्षिक वीज दरवाढीचा फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार वीज कंपन्या अंतिम दोन वर्षांसाठी नव्याने वीज दरांसंदर्भात प्रस्ताव सादर करतात. असा प्रस्ताव मुंबई शहर व उपनगरांत वीजपुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड, टाटा पॉवर व बेस्ट उपक्रम या तिन्ही वितरकांनी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. याच प्रस्तावावर अलीकडेच ऑनलाइन पद्धतीने सुनावणी झाली. तिन्ही कंपन्यांची ही सुनावणी सोमवारी झाली.
विश्वभारत News Website