Breaking News

‘व्हॅलेनटाईन डे’च्या दिवशी अशोक चव्हाण करणार BJP मध्ये प्रवेश!

काँग्रेसमधील प्रभावी नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपण पुढील राजकीय भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले असले तरी, ते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत. त्यांच्यामागोमाग आणखी काही आमदार बाहेर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे ऐन राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसची मोठी राजकीय कोंडी झाली आहे. तर, बुधवारी 14 फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा आहे.

 

राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथल्ला यांच्या उपस्थितीत मुंबईत टिळकभवनात रविवारी झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीस चव्हाण यांनी हजेरी लावली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी ११ च्या वाजल्याच्या दरम्यान चव्हाण यांचे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याचे पत्र टिळकभवनात येऊन धडकल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

 

चव्हाण हे काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य होते. सोमवारी सकाळी विधानभवनात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांचे विश्वासू सहकारी माजी आमदार अमर राजूरकर हे त्यांच्या राजीनाम्याचे पत्र घेऊन टिळक भवन या प्रदेश काँग्रेस कार्यालयात दाखल झाले. त्या पत्रावर चव्हाण यांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला होता. राजूरकर यांनीही काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

 

महाराष्ट्रातील एक प्रभावी राजकीय घराण्यातील अशोक चव्हाण यांनी सुरुवातीला पक्षसंघटनेत काम केले, मात्र वयाच्या २९ व्या वर्षी

 

( १९८७-१९८९ ) त्यांना लोकसभेचे खासदार होण्याची संधी मिळाली. त्यानंतर युती सरकारचा साडे चार वर्षांचा आणि फडणवीस सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ वगळता अशोक चव्हाण कायम सत्तास्थानी राहिले आहेत. महसूल, परिवहन, उद्याोग, सार्वजनिक बांधकाम अशी महत्त्वाची खाती त्यांनी मंत्री म्हणून संभाळली. २००८ ते २०१० या कालावधीत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्या काळाच आदर्श घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे २०१५ ते २०१९ पर्यंत त्यांनी प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली.

गेल्या वर्षी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा महाराष्ट्रात दाखल होण्याआधी काही दिवस चव्हाण यांचा गट भाजपमध्ये जाणार, अशा चर्चाना उधाण आले होते. त्यावेळीही त्यांनी नांदेडमध्ये खास कार्यकर्ता मेळावा घेऊन आपण काँग्रेस सोडणार, असा संशयसुद्धा कोणी घेऊ शकणार नाही, असा दावा केला होता. आता महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असतानाच चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.

About विश्व भारत

Check Also

कौन से हैं वो 3 राज्य, जो चुनावों से पहले BJP के लिए बन गए बड़ा सिरदर्द?

कौन से हैं वो 3 राज्य, जो चुनावों से पहले BJP के लिए बन गए …

महाराष्ट्र तक फैली है शरद पवार की संपत्ती : शेयर्स में की सबसे मोटी रकम इन्वेस्ट

महाराष्ट्र तक फैली है शरद पवार की संपत्ती : शेयर्स में की सबसे मोटी रकम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *