Breaking News

वकील संप करू शकत नाहीत : सर्वोच्च न्यायालय

वकील संप करू शकत नाहीत किंवा कामावर गैरहजर राहू शकत नाहीत,असा महत्वाचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

वकिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी राज्य पातळीवर मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली सर्व उच्च न्यायालयांनी तक्रार निवारण समिती स्थापन करावी असेही निर्देश दिले. तसेच जिल्हा न्यायालय पातळीवरही तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे न्या. एम आर शाह आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठाने सांगितले.

प्रकरण काय आहे?

डेहराडूनच्या जिल्हा वकील संघटनेने त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी योग्य मंच स्थापन करण्यासाठी मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. तो निकालात काढून न्यायालयाने निकालाची प्रत सर्व उच्च न्यायालयांना पाठवण्याचे आदेश दिले. वकिलांनी संप केल्यास किंवा ते कामावर गैरहजर राहिल्यास न्यायालयांच्या कामकाजांवर विपरीत परिणाम होतो असे आम्ही यापूर्वीही अनेक वेळा सांगितले आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

About विश्व भारत

Check Also

गीतांजलि अगमों का राष्ट्रपति मुर्मू को ज्ञापन! PM मोदी- शाह को प्रतिलिपी

गीतांजलि अगमों का राष्ट्रपति मुर्मू को ज्ञापन! PM मोदी- शाह को प्रतिलिपि टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक …

जनता का ध्यान भटकाने भगवान विष्णु पर टिप्पणी व CJI पर जूता काण्ड

जनता का ध्यान भटकाने भगवान विष्णु पर टिप्पणी व CJI पर जूता काण्ड   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *