Breaking News

ठाकरे सरकारने बदल्यांचा धंदा सुरू केला; फडणवीसांचा हल्लाबोल

Advertisements

नागपूर:

Advertisements

करोनाच्या संकटाला प्राधान्य देण्याऐवजी ठाकरे सरकारने राज्यात बदल्यांचा धंदा सुरू केला आहे, अशी टीका करतानाच एक वर्ष बदल्या नाही केल्या तर काय फरक पडतो?, असा सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Advertisements

पूर्व विदर्भात पूराने थैमान घातलं आहे. पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज विदर्भात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात करोनाचं संकट वाढलं आहे. करोनामुळे होणार मृत्यूदरही वाढत आहे. अशावेळी राज्यातील करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र, ते करण्याऐवजी राज्यातील मंत्री आणि अधिकारी कुणाला कुठे आणि कशी पोस्टिंग मिळेल यात गुंग झाले आहेत. करोनाच्या काळात बदल्या करणं इतकं महत्त्वाचं आहे का?, एक वर्ष बदल्या झाल्या नसत्या तर काय फरक पडला असता?, असा सवाल करतानाच राज्यात सध्या बदल्यांचा धंदा सुरू झाला आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

राज्यात १८ ते २० लाख कर्मचारी आहेत. मात्र ही संख्या ७ ते ८ लाख एवढी जरी पकडली आणि त्यातील १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आकडा जरी काढला तरी ही संख्या खूप मोठी होते. करोनाच्या काळात १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेणं हेच चुकीचं आहे, असं सांगतानाच बदली केल्यावर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याला भत्ता द्यावा लागतो. त्यासाठी सुमारे ५०० कोटींचा खर्च येतो. करोनामुळे राज्यात आर्थिक संकट असताना बदल्यांचा खर्च वाढवण्याची काय गरज होती?, असा सवालही त्यांनी केला. काही अत्यंत महत्त्वाच्या बदल्या केल्या असत्या तरी चालल्या असत्या, पण सरसकट बदल्या करणं योग्य नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून मुंबईसह राज्यातील करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. राज्यात आतापर्यंत ४२ लाख ११ हजार ७५२ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ८ लाख ८ हजार ३०६ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. एकूण चाचण्यांच्या १९.१९ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह तर बाकीच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. राज्यात सद्यस्थितीत प्रत्यक्षात १ लाख ९८ हजार ५२३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, असे कालच्या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे. राज्यात करोना मृत्यूदर कमी होत नसल्याने चिंता वाढत चालली आहे. दैनंदिन नवीन करोना बाधित रुग्णांचा आकडाही गेल्या तीन दिवसांपासून १५ हजारच्या वरच आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

रामटेकमध्ये सेनेचा पराभव होण्याची भीती? भाजपचा ‘प्लॅन’ काय आहे?

रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होतोय, अशी शक्यता महायुतीच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवली आहे. पक्षाचा पराभव …

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र फडणवीस का बड़ा हमला

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *