Breaking News

उद्धव ठाकरे वाचाळपणा सोडा, अन्यथा…कोणी केली टीका

“उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलताना भान ठेवावे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होत आहे. मात्र, वाचाळपणा कराल तर एकटे पडाल” असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.

शनिवारी बुलडाण्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी शिंदे गटासह भाजपवरही जोरदार टीका केली. त्यावर आता भाजप आणि शिंदे गटातील नेतेमंडळी उत्तर देताना पाहायला मिळत आहे. “जनाची नाही, मनाची तरी ठेवा” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुलडाणा येथील सभेत केली होती. यावर आता विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिले आहे.

About विश्व भारत

Check Also

अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात : 288 जागांवर देणार उमेदवार

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट हिंदु संरक्षण आणि अखंड भारतासाठी अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र विधानसभा …

चंद्रशेखर बावनकुळे यांना मौदा-कामठीतून उमेदवारी घोषित : टेकचंद सावरकर यांना धक्का

कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह 99 उमेदवारांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *