“उद्धव ठाकरे एका पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री असताना त्यांनी बोलताना भान ठेवावे. सत्ता गेल्याने त्यांचा थयथयाट आणि चिडचिड होत आहे. मात्र, वाचाळपणा कराल तर एकटे पडाल” असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
शनिवारी बुलडाण्यात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी शिंदे गटासह भाजपवरही जोरदार टीका केली. त्यावर आता भाजप आणि शिंदे गटातील नेतेमंडळी उत्तर देताना पाहायला मिळत आहे. “जनाची नाही, मनाची तरी ठेवा” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुलडाणा येथील सभेत केली होती. यावर आता विखे पाटलांनी प्रतिउत्तर दिले आहे.