राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे. हा वाद शांत करण्यासाठी 15 फेब्रुवारीला मुंबईत बैठक होणार आहे. यात विदर्भातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांची भूमिका महत्वाची असेल. चार भिंतीच्या आत हा वाद संपवायचा आहे. हायकमांडकडे न जाता राज्यातील वाद येथेच कसा मिटविता येईल, याकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. नाना पटोले यांच्या भूमिकेशी आपण सहमत नसल्याचे संकेत केदार यांनी एका खासगी वाहिनीशी बोलताना दिले.
काय आहे प्रकरण?
नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला.