महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात न्यायाधीस नसल्याने शेतकऱ्यांच्या प्रकरणावर परिणाम होत आहे. नागपूर येथील महसूल न्यायाधिकरणात दोन न्यायाधीस पाहिजेत. मात्र, एक न्यायाधीस एक पद रिक्त आहे. मागील एक वर्षांपासून एका देवस्थानचे प्रकरण थंडबसत्यात अडकून पडले आहे, असा दावा नागपूर हायकोर्टातील वकील मनोज मिश्रा यांनी केला आहे.
तसेच कर्मचारी निव्वळ मोबाईलवर असतात. कामाचा ढिगारा असतानाही न्यायाधिकरणात कर्मचारी मनोरंजन करीत असतात. विदर्भातील बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रकरण प्रलंबित असल्याने सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे.