Breaking News

गत 24 तासात  1300  कोरोनामुक्त, 1529 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

गत 24 तासात  1300  कोरोनामुक्त,

1529 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

Ø आतापर्यंत 37,715 जणांची कोरोनावर मात

Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,843

चंद्रपूर, दि. 26 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1300 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1529 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 54 हजार 369 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 37 हजार 715  झाली आहे. सध्या 15 हजार 843 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 59 हजार 554  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 478 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील श्यामनगर परिसरातील 58 वर्षीय पुरुष, श्रीराम वार्ड येथील 47 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथील 65 वर्षीय महिला व 67, 50 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 58,70 व 72  वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील 45 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी वार्ड येथील 41 वर्षीय पुरुष, चुनाळा येथील 65 वर्षीय पुरुष,

चिमूर तालुक्यातील बोथली येथील 37 वर्षीय महिला, खडसंगी येथील 70 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, व 47 वर्षीय महिला, गोंडपिपरी तालुक्यातील 67 वर्षीय महिला व 51 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्ड येथील 62 वर्षीय पुरुष, देलनवाडी येथील 65 वर्षीय पुरुष ,गडचांदूर येथील 40 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी येथील 58 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा तर गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील 74 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत 811 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 747, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1529 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 621, चंद्रपूर तालुका 61, बल्लारपूर 60, भद्रावती 138, ब्रम्हपुरी 112, नागभिड 27, सिंदेवाही 38, मूल 73, सावली 20, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 43, राजूरा 31, चिमूर 73, वरोरा 120, कोरपना 59, जिवती 21 व इतर ठिकाणच्या 21 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *