Breaking News

गत 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 पॉझिटिव्ह तर 5मृत्यू

गत 24 तासात 342 कोरोनामुक्त,177 पॉझिटिव्ह तर 5मृत्यू

चंद्रपूर, दि.3 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 342 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 177 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 5बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे.

आज (दि.3) एकूण 2723 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 177 पॉझिटिव्ह तर 2546 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. बाधित आलेल्या 177 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 54, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 28, भद्रावती 27, ब्रम्हपुरी 3, नागभिड 0, सिंदेवाही 0, मूल 9, सावली 1, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 4, राजूरा 8, चिमूर 2, वरोरा 5, कोरपना 6, जिवती 5 व इतर ठिकाणच्या 3 रुग्णांचा समावेश आहे.  आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील 43 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील नेताजी नगर येथील 57 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील 59 वर्षीय पुरुष तर वणी-यवतमाळ येथील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 83 हजार 228 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 79 हजार 813 झाली आहे. सध्या 1 हजार 945 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 79 हजार 12 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 93 हजार 89 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1470 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1361, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली 38, यवतमाळ 51, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *