Advertisements
विश्व भारत ऑनलाईन :
सेल्फी घेण्याचा नाद कधी आनंद तर कधी दुःख तयार करतो. असाच सेल्फीचा नाद पुन्हा एकदा जीवावर बेतला आहे. सेल्फी घेण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी बुडाल्या आहेत. ठाणेजवळील विरारच्या वैतरणा खाडी बंदरावर ही घटना घडली आहे. दोन महिलांना वाचविण्यात यश आले असून दोघींचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
Advertisements
सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडत असतात. पण यावेळी फोटो किंवा सेल्फी काढण्याचा मोह लोकांना आवरत नाही. काहीवेळी सेल्फीचा नाद जीवावर बेततो.त्यातूनच ही घटना समोर आली आहे.
Advertisements
Advertisements