विश्व भारत ऑनलाईन :
सर्व क्रिकेटप्रेमी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची वाट पाहत असतात. येत्या रविवार 23 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या मैदानावर महायुद्ध रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मेलबर्नमध्ये वर्ल्डपकपचा सामना होणार आहे. पण, चाहत्यांच्या या आनंदावर पाणी फिरू शकते. आणि याचे मुख्य कारण ठरू शकतो तो म्हणजे पाऊस.
T20 वर्ल्डकप 2022 मध्ये, 23 ऑक्टोबर रोजी होणार्या भारत-पाकिस्तानच्या हाय-व्होल्टेज सामन्याची मजा मेलबर्नचं हवामान खराब करू शकते. मेलबर्नमध्ये त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे क्रिकेटच्या महायुद्धाचा खेळ पावसामुळे खराब होण्याची भीती आहे.