पॅरोलवरील कैद्याकडून 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी येरवडा कारागृहातील हवालदार बाजीराव जोतिबा पाटील (वय 54) आणि रेहाना आसिफ सय्यद (वय 48) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रांगेहाथ पकडले. याप्रकरणी एका कैद्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदार कैद्यास शिक्षा झालेली आहे. त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला असून, सध्या तो कारागृहाबाहेर आहे. यादरम्यान हवालदार बाजीराव पाटील यांनी कैद्याला 50 हजार रुपयांची लाच मागितली. लाच न दिल्यास खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येईल, तसेच गैरवर्तणुकीचा अहवाल कारागृह प्रशासनास पाठविण्यात येईल, असे सांगितले.
विश्वभारत News Website