औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही घटना आहे. घटनेनंतर चिमुरडीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय.
श्रेया असं मृत लहानगीचं नाव आहे. माहितीनुसार, श्रेया जेवन झाल्यानंतर हात धुण्यासाठी गेली. मात्र तेथे पाय घसरुन ती खाली पडली. त्याठिकाणी बादलीत हीटरच्या साह्याने पाणी केलं होतं. हीटरने गरम झालेल्या पाणी अंगावर पडल्याने श्रेया भाजली. वाळूज परिसरातील साईनगर कमळापूर येथे ही घटना घडली.