नवनीत राणांना पाडणं हेच आमचं लक्ष्य आहे, असे मत कडू यांनी व्यक्त केले.
अमरावतीतलं चित्र हे अमरावतीकरांच्या मनातलं असेल. जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र झालं पाहिजे. आपल्यापेक्षा ज्याला पाडायचं आहे ते लक्ष्य मनात ठेवलं पाहिजे. कोणता उमेदवार निवडून येतो त्यापेक्षा नवनीत राणांना पाडणं हे लक्ष्य असलं पाहिजे. रवी राणा घरात घुसून मारण्याची भाषा करतो, कुठेही गेलं तरी पैसे खायचे. आता पाहू पैशात दम आहे की आमच्या प्रामाणिकपणात दम आहे. स्वाभिमान पक्ष विकून भाजपाच्या दावणीला आम्ही बांधला नाही. दिव्यांग मंत्रालयाचा शब्द दिला म्हणून मी गुवाहाटीला गेलो होतो. बाकी माझ्या मनात काहीही नव्हतं असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला होता. त्यामुळेच आम्ही बरोबर आहोत. आमच्या मतदारसंघात खोके घेणारा नाही दणके देणारा आमदार आहे हे दाखवून देऊ.
विश्वभारत News Website