Breaking News

गत 24 तासात 922 कोरोनामुक्त , 1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

Advertisements

गत 24 तासात 922 कोरोनामुक्त

Advertisements

1537 पॉझिटिव्ह तर 28 मृत्यू

Advertisements

Ø  आतापर्यंत 32,602 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 13,173

चंद्रपूर, दि. 22 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 922 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1537 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 28 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 47  हजार 983 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 33 हजार 524 झाली आहे. सध्या 13 हजार 760 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 44 हजार 707  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 90 हजार 409 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 44 व 56 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 65 वर्षीय पुरुष, भिवापूर येथील 50 वर्षीय पुरुष, महाकाली कॉलनी परिसरातील 58 वर्षीय महिला, अंचलेश्वर गेट परिसरातील 55 वर्षीय महिला, विवेक नगर येथील 62 वर्षीय पुरुष, नगीना बाग येथील 55 वर्षीय पुरुष, गजानन महाराज चौक परिसरातील 56 वर्षीय पुरुष, चिंचाळा येथील 70 वर्षीय महिला.घुगुस येथील 55 वर्षीय पुरुष.सिंदेवाही तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष,बरडकिन्ही येथील 65 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला.चिमूर तालुक्यातील हिरापूर येथील 40 वर्षीय पुरुष, पिंपळगाव येथील 68 वर्षीय महिला, 37 वर्षीय पुरुष, वडाला पैकु येथील 72 वर्षीय महिला.मूल तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष,भद्रावती तालुक्यातील पंचशील नगर येथील 74 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील मोकाशी लेआउट येथील 60 वर्षे पुरुष.गडचांदूर येथील 50 वर्षीय पुरुष. राजुरा येथील 45 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील 36 व 53 वर्षीय महिला, भंडारा येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 699 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 647, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 21, भंडारा चार , गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1537  रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 549, चंद्रपूर तालुका 64,  बल्लारपूर 69, भद्रावती 149, ब्रम्हपुरी 119, नागभिड 29, सिंदेवाही 34, मूल 90, सावली 23, पोंभूर्णा 02, गोंडपिपरी 19, राजूरा 38, चिमूर 60, वरोरा 190, कोरपना 78, व इतर ठिकाणच्या 24 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

विदर्भात १० ते १४ फेब्रुवारीपर्यंत पावसाचा अंदाज

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामानाचा कोणताही निश्चित अंदाज देणे आता कठीण झाले आहे. पावसाळ्यासाठी कोणताही एक …

मार्केटमध्ये आग लागून चार दुकाने खाक : अग्निशमन दल गायब

आज सोमवारी पहाटेच्या सुमारास चार दुकानाला अचानक आग लागली. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *