Breaking News

गत 24 तासात 1642 कोरोनामुक्त,  1449 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

Advertisements

गत 24 तासात 1642 कोरोनामुक्त,

Advertisements

 1449 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

Advertisements

Ø  आतापर्यंत 52,447 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,882

चंद्रपूर, दि. 7 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1642 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1449 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 69 हजार 388 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 52 हजार 447 झाली आहे. सध्या 15 हजार 882 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 4 हजार 847  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 30  हजार 976 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील हनुमान नगर तुकूम येथील 70 वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील 40 वर्षीय पुरुष, रामनगर परिसरातील 65 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष, 45, 58, 62 वर्षीय पुरुष ,65,55 व 72 वर्षीय महिला, मारेगाव चंद्रपूर येथील 45 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील 40 वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष, सावली तालुक्यातील व्याहाड येथील 74 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील 53,56  व81 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष. गोंडपिपरी तालुक्यातील 42 वर्षीय  पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1059 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 977, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 30, यवतमाळ 36, भंडारा 10 , गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1449 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 392, चंद्रपूर तालुका 81 , बल्लारपूर 72, भद्रावती 149, ब्रम्हपुरी 52, नागभिड 22, सिंदेवाही 38, मूल 32, सावली 31, पोंभूर्णा 18, गोंडपिपरी 65, राजूरा 117, चिमूर 55, वरोरा 161, कोरपना 145,  जिवती 01 व इतर ठिकाणच्या 18 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *