Breaking News

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये , कृषी विभागाचे आवाहन

Advertisements

शेतकऱ्यांनी 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये

Advertisements

Ø कृषी विभागाचे आवाहन

Advertisements

चंद्रपूर दि. 3 जून : 2  ते 4 जून 2021 या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दि. 5 जून 2021 रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग , पुणे यांनी वर्तवली आहे. जिल्हयातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्या वर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन, कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

सोयाबीन, तूर ,भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरीता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.  विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकांची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. असे जिल्हयातील शेतकरी बंधूना कृषी विभागामार्फत कळविण्यात येत आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

कामठी, मौदा, रामटेक, पारशिवनी तालुक्यातील पिकांचे नुकसान : पाऊस इतका झाला नसताना शेतात आणि घरात पाणी

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये …

टमाटरचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात : टमाटरवर फिरवला नांगर

वेळेला पैशापेक्षाही खूप महत्व आहे. हीच बाब टमाटरला लागू पडते. पंधरवडय़ापूर्वी प्रतिकिलो २०० रुपयांचा विक्रमी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *