Breaking News

15 बसेस जाळल्या : एसटी बसेसची काळजी घ्या; सर्व आगारांना आदेश

Advertisements

जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. उद्या राज्यात बंदची हाक येऊ शकते. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तर आतापर्यंत १४ ते १५ एसटी बस जाळण्यात आल्या आहेत.

Advertisements

यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालं असून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश राज्य परिवहन मंडळाने राज्यातील सर्व आगारांना दिले आहेत.

Advertisements

सध्या नाशिकहून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नंदुरबार एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली असून हिंगोली आगाराची एसटी बस वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, एसटी बस बंद असल्याचे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

दुरांतो,महानगरी,अमरावती रेल्वे एक्सप्रेसच्या वेळात बदल

मुंबई विभागातील मध्य रेल्वेने वाढत्या रेल्वे वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात व्यापक फेरबदल …

नागपुरात अचानक विमान प्रवासी…!

नागपूर आणि विदर्भातील उद्योग, खाण आणि पर्यटन क्षेत्रात रेलचेल वाढल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *