Breaking News

15 बसेस जाळल्या : एसटी बसेसची काळजी घ्या; सर्व आगारांना आदेश

Advertisements

जालन्यात पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. उद्या राज्यात बंदची हाक येऊ शकते. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. काही ठिकाणी आंदोलकांनी एसटी बसेसची तोडफोड केली आहे. तर आतापर्यंत १४ ते १५ एसटी बस जाळण्यात आल्या आहेत.

Advertisements

यामुळे महामंडळाचं मोठं नुकसान झालं असून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश राज्य परिवहन मंडळाने राज्यातील सर्व आगारांना दिले आहेत.

Advertisements

सध्या नाशिकहून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नंदुरबार एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली असून हिंगोली आगाराची एसटी बस वाहतूक पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, एसटी बस बंद असल्याचे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अयोध्‍येला जाण्‍यासाठी नागपूर?अमरावतीहून विशेष रेल्‍वे

उत्तर प्रदेशातील अयोध्‍या येथे २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्‍तांना रामलल्‍लांचे …

नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा

रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *