Advertisements
गडचांदूर भाजपतर्फे आणीबाणी “काळा दिवस” म्हणून साजरा.
(तुरूंगवास भोगलेले “महेश शर्मा” यांचा सत्कार.)
कोरपना (ता.प्र.):-
काँग्रेस सरकार द्वारे २५ जून १९७५ रोजी संपुर्ण भारतात आणीबाणी लागू करून लोकशाहीची हत्या करण्यात आली.मानव अधिकाराचे हनन करून देशवासीयांवर विवीध प्रकारचे अन्याय,अत्याचार करणारा देशाच्या इतिहासातील आणीबाणी काळादिवस म्हणून २५ जून हा दिवस भाजपच्या वतीने साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात भाजपतर्फे आणीबाणी काळात ज्या समाजसेवक,नागरिक, कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात टाकले, अशांचा सत्कार करण्यात आला.या पार्श्वभूमीवर माजी वित्त,नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांच्या सुचनेनुसार गडचांदूर भाजपतर्फे २५ जून रोजी स्थानिक पेट्रोल पंप चौकात काळा दिवस म्हणून पाळण्यात आला. यानिमित्ताने मिसा बंदींचा सत्कार करण्यात आला.
ज्यावेळी जयप्रकाश नारायण यांनी आंदोलन केले त्यावेळी त्यात सहभाग घेणाऱ्या नागरिकांना मारझोड करून तुरुंगात डांबले. त्यापैकी पुर्वी बिहारचे रहवासी असलेले सध्या गडचांदूर येथे वास्तव्यास असलेले महेश शर्मा यांचा शहर भाजपाच्या वतीने शाल,श्रीफळ व वाफारा मशीन देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महेश शर्मा यांनी त्यावेळी झालेला अन्याय,अत्याचार,हुकूमशाही,दडपशाही विषयी सखोल माहिती दिली.तसेच गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,गोपाल मालपाणी,प्रा.शेख मेहताब,नगरसेवक अरविंद डोहे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी नगरसेवक रामसेवक मोरे,हरीश घोरे,जेष्ठनेते महादेव एकर,संदीप शेरकी,कृष्णा भागवत,हेमंत पातूरकर,अरूण विधाते,भास्कर उरकुंडे, गणपत बूरडकर,अरविंद कोरे,इम्रान शेख, अजी़म बेग,रोहन काकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रास्ताविक नगरसेवक डोहे तर आभार संदीप शेरकी यांनी मानले.
Advertisements