Breaking News

मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप ; कारण काय?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

सीएनजीत दरवाढ लक्षात घेता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार भाडेवाढ मिळावी, या मागणीसाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने १५ सप्टेंबरपासून पुकारलेला बंद तूर्तास मागे घेतला होता. मात्र, १३ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शब्द न पाळल्याचा आरोप करत मुंबईतील रिक्षा-टॅक्सी चालकांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

Advertisements

२६ सप्टेंबरपासून हा बेमुदत संप सुरू होणार असल्याची त्यांनी परिपत्रकात म्हटले आहे. १३ सप्टेंबररोजी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी आमच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा केली होती. यावेळी राज्य सरकार मुंबई टॅक्सी मेन्स युनियनच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणार असून संप मागे घ्यावी, अशी विनंती उद्य सामंत यांनी केली होती. त्यानुसार आम्ही संप मागे घेतला होता. मात्र, उदय सामंत यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे मुंबई टॅक्सी मेन्स युनियन आणि ऑटो-रिक्षा युनियनने २६ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर, अमरावती, चंद्रपूर, संभाजीनगर महापालिका निवडणुका लांबणीवर

राज्याच्या राजकारणातली आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या नागपूर, मुंबईसह सर्वच महापालिका …

ठाकरेंना धक्का देण्यासाठी बावनकुळे, शेलार अमित शाहांच्या भेटीला

विश्व भारत ऑनलाईन : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. एकनाथ शिंदे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *