Breaking News

गडचिरोलीत चालत्या दुचाकीवर पडली वीज : पती-पत्नी, 2 मुली ठार

गडचिरोली जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने पती, पत्नीसह दोन चिमुकल्या मुली जागीच ठार झाल्या. ही घटना सोमवारी (दि.२४) संध्याकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास देसाईगंज-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरीजवळ घडली.

मृतकांची नावे

भारत राजगडे(३५), अंकिता राजगडे(२८), चिऊ राजगडे(१), देवांशी राजगडे(४) अशी मृतांची नावे असून, हे कुटुंब देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी होते. भारत राजगडे हे आपल्या कुटुंबासह पुराडापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखलधोकडा येथे लग्नाला मोटारसायकलने गेले होते.

कार्यक्रम आटोपून परत येताना देसाईगंजनजीकच्या दूध डेअरीजवळ पोहचताच रिमझिम पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते एका झाडाखाली थांबले. यावेळी अचानक वीज कोसळल्याने चौघेही जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

About विश्व भारत

Check Also

गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …

बनावटी और झूठे आंसुओं का पर्दाफाश : ‘कातिल’ पत्नी गिरफ्तार

बनावटी और झूठे आंसुओं का पर्दाफाश : ‘कातिल’ पत्नी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *