Breaking News

प्रश्न दोन हजारचा : पीएम किसानचे काम ठप्प का?कारण वाचा…!

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. हे काम आता कृषी विभागामार्फत केले जाणार आहे. पीएम किसानची सर्व प्रक्रिया ऑनलाइन असून, कृषी विभागाला हे काम सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन व पासवर्डच अद्याप न मिळाल्याने अनेक जिल्ह्यात पीएम किसानचे कामकाज ठप्प पडले आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली आहे. आतापर्यंत हे काम कोणी करायचे हे निश्चित नव्हते. कामांच्या जबाबदार्‍यांवरून कृषी, महसूल व ग्रामविकास खात्यात वाद झाले होते.

या वादाचा फटका शेतकर्‍यांनाच बसत होता. या योजनेची अंमलबजावणी आधी महसूल विभागाकडे होती. योजनेची सर्वांत चांगली अंमलबजावणी देशपातळीवर महाराष्ट्रानेच केली होती. केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाचा गौरव केला तेव्हा पारितोषिक घेण्यासाठी महसूलऐवजी कृषी विभागाची वर्णी लागली. यावरून महसूल कर्मचार्‍यांनी योजनेच्या कामावरच बहिष्कार टाकला. शासनाने हा पेच सोडविण्यासाठी आता नवी कार्यपद्धती आणली असून, हे काम कृषी विभागाकडे सोपवले आहे.

पीएम किसान योजनेची सर्व कार्यपद्धती ऑनलाइन आहे. यासाठी शासनाकडून कृषी विभागाला, प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र लॉगिंन आयडी आणि पासवर्ड देणे अपेक्षित आहेत. त्यानंतर संबंधित अधिकारी शेतकर्‍यांचे अर्ज ऑनलाइन भरून घेऊ शकतात किंवा काही दुरुस्ती असेल, तर त्यामध्ये बदल करून शकणार आहेत. परंतु अद्यापही कृषी विभागाला हा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळालेला नाही. त्यामुळे सध्या पीएम किसान योजनेचे काम ठप्प झाले आहे. शेतकरी दररोज तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे घालून दमले आहेत.

About विश्व भारत

Check Also

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन 

PWD जांच करेगी : IAS अधिकारी की फ‍िर बढ़ी टेंशन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांची मुंबईवारी

अर्थ राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांनी गडचिरोलीत औषध व वैद्यकीय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *