Breaking News

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द,पुढील वर्गात प्रवेश

Advertisements

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द
मुंबई-
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी त्यांनी ही माहिती दिली आहे.

Advertisements

वर्षा गायकवाड म्हणाल्या, राज्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आपल्याशी संवाद साधत असताना, इयत्ता पहिली ते आठवीचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे. मधल्या काळात ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, तसेच गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले. या वर्षात आपण पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करू शकलेलो नाही. पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या, परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या, काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकलेल्या नाहीत. परंतु आपण मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध माध्यमातून शिक्षण पोहचावण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत होतो.

Advertisements

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत, आरटीईच्या अंतर्गत म्हणजे मोफत शिक्षण अधिकाराच्या कायद्यांतर्गत, आज आम्ही शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून असा निर्णय घेत आहोत की, राज्यातील जे पहिली ते आठवी इयत्तेमधील शिक्षण हक्क अधिकाऱाच्या अंतर्गत जे विद्यार्थी येतात, त्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करून पुढील इयत्तेत पाठवण्यात येत आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

बालासोर रेल हादसे के घायलों को अस्पताल में दिए जा रहे 50 हजारः PM मीदी आज जाएंगे बालासोर

ओडिशा के बालासोर में शुक्रवार शाम को कोरोमंडल एक्सप्रेस के चार डिब्बे मालगाड़ी से टकराने …

20 साल बाद रेल का बडा हादसा : उडीसा के बालासोर में 300 से ज्यादा यात्रियों की मौत : 1000 से ज्यादा घायल !

ओडिशा के बालासोर जिले में कोरोमंडल एक्सप्रेस और मालगाड़ी आपस में टकरा गई है. जाणकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *