Breaking News

631 जणांची कोरोनावर मात,1213 नवे बाधित; 22 जणांचा मृत्यू!

Advertisements

1213 नवे बाधित; 22 जणांचा मृत्यू!
– 631 जणांची कोरोनावर मात
चंद्रपूर-
जिल्ह्यात मागील 24 तासात 1213 बाधितांची नव्याने भर पडली असून, 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तथापि, 631 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11 हजार 541 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 32 हजार 411 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 2 लाख 81 हजार 856 नमुने नकारात्मक आले आहेत.
मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील दादमहल वार्ड येथील 60 वर्षीय पुरुष, जेबी नगर येथील 75 वर्षीय महिला, पठाणपुरा वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 62 वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील 75 वर्षीय महिला, अंचलेश्वर वार्ड येथील 80 वर्षीय महिला, नगीनाबाग येथील 50 वर्षीय पुरुष, जटपुरा गेट परिसर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर, भद्रावती येथील 69 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील 35 वर्षीय पुरुष व 80 वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील 56 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील विठ्ठल मंदिर वार्डातील 65 वर्षीय व साईनगर येथील 65 वर्षीय पुरुष, नागभीड येथील 45 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 40 वर्षीय 60 वर्षीय व 50 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 56 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 31 वर्षीय महिला, भंडारा येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 573, तेलंगणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा 3, गोंदिया 1 आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. सोमवारी बाधित आलेल्या 1213 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 70, बल्लारपूर 58, भद्रावती 86, ब्रम्हपुरी 148, नागभीड 25, सिंदेवाही 34, मूल 45, सावली 13, पोंभूर्णा 8, गोंडपिपरी 16, राजुरा 102, चिमूर 93, वरोरा 157, कोरपना 30, जिवती 13 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.
नागरिकांनी मुखाच्छादनाचा वापर करावा, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रीसुत्रीचे पालन करावे, स्वत:ची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात वीज पडून 11 जणांचा मृत्यू : 1600 घरे उद्ध्वस्त

विदर्भातील नागपूर विभागात पूर आणि वीज पडून किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 …

कुटुंब झोपेत असताना महिलेवर वाघाचा हल्ला; बापलेकाने झुंज देत वाचविले प्राण

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने मेंढपाळाच्या कुटुंबावर हल्ला केला. रात्री परिवार झोपेत असताना वाघाने हल्ला चढविला. मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *