महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचे तापमान देशात सर्वाधिक उष्ण

महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणाचे तापमान देशात सर्वाधिक उष्ण

नागपूर –विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. सोमवारी पारा चाळीशी पार पोहोचला. सोमवारी ब्रह्मपुरी येथे देशातील सर्वाधिक ४०.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अकोल्यात ३९.५ आणि चंद्रपुरात ३९.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सो
पमान मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापले आहे. त्यामुळे एप्रिल, मे मध्ये पारा कुठवर पोहोचणार, असा

 प्रश्न नागपूरकरांना पडू लागला आहे. पुढील चार दिवस वातावरण असेच कोरडे राहणार असून किमान तापमानही ३९ अंशांच्या आसपासच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
देशातील सर्वाधिक उष्ण शहरे
ब्रह्मपुरी : ४०.१
अकोला : ३९.५
चंद्रपूर: ३९.४मवारी राज्यातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी पहिली तीन शहरे ही विदर्भातीलच होती.
गेल्या काही दिवसांत शहरातील कमाल आणि किमान या दोन्ही तापमानात वाढ झाली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच हळूहळू उन्हाळ्याचे वेध लागत आहेत. सोमवारी शहरातसुद्धा ३८.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. याखेरीज सोमवारी शहरात १८.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आता दिवसाच्या तापमानातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे सिग्नल दरम्यान, विविध चौकांमध्ये सावली शोधणारे दुचाकीस्वार दिसू लागले आहेत. सहसा मार्च महिन्याच्या सुरुवातीला इतकी उष्णता नसते. मात्र, यंदा विदर्भातील ता

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील कॉटन मार्केटमध्ये रेल्वे पुलाखालून वाहतूक बंद

नागपुरातील लोहा पुलाचे बांधकामामुळे कॉटन मार्केट चौकाकडून सीताबर्डीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे कॉटन मार्केट …

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *