Breaking News

पंतप्रधान पीक विमा योजनेत नियमबाह्य नियुक्ती? : शेतकऱ्यांची चौकशीची मागणी

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि नरखेड तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने योग्य शिक्षण नसलेल्या तरुणांची निवड केल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisements

कंपनीने केलेल्या बोगस भरतीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून काही शेतकऱ्यांनी केली आहे. सन 2022-23 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी तालुका प्रतिनिधी नेमताना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यात पदवीधारक असणे आवश्यक आहे. मात्र, सर्व नियमांना डावलून शैक्षणिक अहर्ता पूर्ण न केलेल्या तरुणांची नियुक्ती कंपनीने केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांना काही शेतकऱ्यांनी पत्र पाठवून न्यायाची मागणी केली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. …

नागपुरात आज व उद्या पावसाचा अंदाज

राज्यासह उन्ह पावसाचा खेळ सुरु आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *