विश्व भारत ऑनलाईन :
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र लुटून खाल्ला, असा आरोप आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला तसेच उद्धव ठाकरे नावालाच मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादीवालेच सरकार चालवीत होते, असेही सावंत म्हणाले. उस्मानाबादमध्ये दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या हिंदूगर्जना मेळाव्यात बोलत असताना त्यांनी ही टीका केली.
सावंत यांची जीभ घसरली
‘ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातले त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिलीत. ते आम्हाला म्हणतात तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका. पण तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता. शिवाजी महाराज आणि तुमचा संबंध काय असा प्रश्नही तानाजी सावंत यांनी विचारला.’