Breaking News

जिल्हा परिषद पदभरती रद्द :१३ हजार पदांची प्रक्रिया रखडली

विश्व भारत ऑनलाईन :
जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५१४ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जातील तपशीलामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

ग्रामविकास विभागाकडून १८ सवर्गांच्या गट क च्या १३ हजार ५१४ पदांसाठी मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, अनेक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडत चालली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, कोरोना महामारी, आरक्षणाचा प्रश्न आदी कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रेंगाळली होती. आता ही भरती प्रक्रिया रद्द केल्याचे ग्रामविकास खात्याने जाहीर केले. वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत देण्यात येणार आहे.

About विश्व भारत

Check Also

आर्थिक गुन्ह्यात तीनदा अडकलेले नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. धवनकर कसे सुटतात?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सात प्राध्यापकांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी जनसंवाद विभागाचे प्राध्यापक डॉ. …

सांसद बंटी विवेक साहू के प्रयासो से छिन्दवाडा में बना परीक्षा केन्द्र

सांसद बंटी विवेक साहू के प्रयासो से छिन्दवाडा में बना परीक्षा केन्द्र टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *