Breaking News

जाग आली : उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर

विश्व भारत ऑनलाईन :

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या,रविवारी उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनकडून (ठाकरे गट) देण्यात आली.

मराठवाड्यात 15 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून, वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही,अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.

About विश्व भारत

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे कामठी-मौदातून लढणार : ‘विश्व भारत’ची बातमी ठरली खरी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच कोण कोठून लढणार याचे आराखडे बांधणे सुरू केले आहेत. अशातच …

माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डीची भाजपमधून का झाली हकालपट्टी?आशिष जैस्वालला विरोध

जाहीरपणे कोणी महायुतीच्या विरोधात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून वक्तव्य किंवा बंड पुकारले जात असेल अशा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *