Breaking News

मराठवाडा

वृक्षारोपण घोटाळा : मुख्य अभियंता घोगरे यांचे दोषींना अभय : मराठवाड्यातील अपंग जलप्रकल्पांची व्यथा

औरंगाबाद जिल्ह्यात जलसंपदा विभागाने वृक्षारोपण घोटाळा केला आहे. यात अभियंता गोडसे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे,रउफ पटेल यांनी केला आहे. दोषी व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय देणाऱ्या जलसंपदाचे मुख्य अभियंते विजय घोगरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रउफ पटेल यांचा पाठपुरावा कायम सुरु आहे. त्याविषयी सध्या मराठवाड्यातील जलप्रकल्पांची काय स्थिती आहे, याचा घेतलेला आढावा… …

Read More »

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचे आर्थिक शोषण

प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारी विविध शुल्क वसुली थांबवावी, अशी मागणी होत आहे. ही वसुली तात्काळ थांबवून नियमानुसार लाभार्थ्यांना योजनेचे हप्ते वाटप करावेत, अशी मागणी समोर येत आहे.परभणी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना याबाबतचे बुधवारी काही जणांनी निवेदन दिले. काय आहे निवेदनात? मानवत नगरपालिका अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यालयीन, विकास व प्रशासन शुल्क आणि मालमत्ता कर असे …

Read More »

महाराष्‍ट्र गुजरातला देणार वाघ : बदल्‍यात कोल्‍हा अन् इमू मिळणार

मागील काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक नियोजित उद्योग गुजरात राज्यात गेल्याचा आरोप झाला. त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले. आता औरंगाबादेतील दोन वाघही गुजरातला जात आहेत. अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणिसंग्रहालयाला दोन वाघ देण्याच्या आणि त्यांच्याकडून कोल्हा, इमू यासह इतर काही प्राणी स्वीकारण्याच्या प्रस्तावाला औरंगाबाद महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार येत्या पंधरा दिवसांत प्राण्यांचे हे हस्तांतरण होणार आहे. महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयात तीनशेहून …

Read More »

शिव भोजन थाळीचे बील काढण्यासाठी 80 हजाराची लाच : लाचलूचपतच्या पोलीस निरीक्षकही जाळ्यात

✳️पहिली घटना शिवभोजन थाळीचे थकीत देयक काढण्यासाठी 80 हजाराची लाच घेताना वाशिम येथील पुरवठा निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. निलेश विठ्ठल राठोड असे पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे. ही कारवाई अमरावती लाचलूचपत विभागाने केली. ✳️दुसरी घटना नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजारांची लाच घेताना अटक करण्यात …

Read More »

जाग आली : उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर

विश्व भारत ऑनलाईन : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या,रविवारी उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनकडून (ठाकरे गट) देण्यात आली. मराठवाड्यात 15 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले …

Read More »

817 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, 260 मदतीपासून दूर

विश्व भारत ऑनलाईन : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत झालेल्या ८१७ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये ३७९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत, तर २६० प्रकरणे ही अपात्र ठरविण्यात आली आहेत. १७८ प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. याच कालावधीत सर्वाधिक २३२ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्या आहेत. त्याखालोखाल यवतमाळ जिल्ह्यात २१८, बुलढाणा जिल्ह्यात १८५, अकोल्यात १०१ तर वाशीम जिल्ह्यात ८१ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली …

Read More »

जमलं नाही तर कुस्ती…दानवेंचे अब्दुल सत्तारांना प्रत्युत्तर

विश्व भारत ऑनलाईन : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत असतात. जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळू, स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपनं …

Read More »

मराठवाड्यात गाव विक्रीला : वाचा… कारण आणि कुठे?

विश्व भारत ऑनलाईन : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील माहेर गावात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीला काढले आहे. हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि.मी अंतरावर आहे. मात्र या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका आणि जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. १६ वर्षापूर्वी म्हणजेच २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले …

Read More »

अवैध वाळू प्रकरण विधानसभेत : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढले, वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : विधानसभेपर्यंत गाजलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणात परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पहिल्यांदाच सर्वत्र चौकशीची थेट मागणी करण्यात आली होती.यांनतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेले गौण खनिजचे काम हे त्यांच्याकडून काढून घेत थेट जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. तसेच कुळ,इनाम जमिनी सुनावणीची प्रकरणे …

Read More »

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष, सिंचनाची श्वेतपत्रिका काढा-कारेमोरे

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात सर्वाधिक धरणे मराठवाड्यात आहेत. येथे किमान दहा लाख हेक्टर जमिनीचे सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र, दाेन ते तीन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येते. फक्त कागदावरच. पाण्याअभावी शेतकरी आत्महत्याग्रस्त ठरलेल्या मराठवाड्याच्या सिंचनप्रश्नावर मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. मराठवाड्यात पाणी स्थिती …

Read More »