विश्व भारत ऑनलाईन :
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत असतात. जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळू, स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.जालन्यात सामान्य रुग्णालयाच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपनं मैत्रीपूर्ण लढत करावी असं आवाहन कालं केलं होतं. सत्तारांच्या याच वक्तव्यावर दानवेंनी प्रतिउत्तर दिलं आहे. दानवे म्हणाले, जमलं तर भाई-भाई, नाही जमलं तर कुस्ती खेळु स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही आमची ताकद दाखवू आणि या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येवून जिल्हा परिषद नगरपरिषद ताब्यात घेवू असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.