Breaking News

मराठवाडा

मराठवाड्यात गाव विक्रीला : वाचा… कारण आणि कुठे?

विश्व भारत ऑनलाईन : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील माहेर गावात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण गावच विक्रीला काढले आहे. हे गाव ताडकळस ते पालम राज्य रस्त्यावर पश्चिमेस साडेतीन कि.मी अंतरावर आहे. मात्र या गावाला इतर गावाशी, मुख्यालयाशी तालुका आणि जिल्हा जोडणारा दळणवळणासाठीचा पक्का रस्ता नाही. १६ वर्षापूर्वी म्हणजेच २००५ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने या रस्त्याचे खोदकाम व मातीकाम करण्यात आले …

Read More »

अवैध वाळू प्रकरण विधानसभेत : अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार काढले, वाचा…

विश्व भारत ऑनलाईन : विधानसभेपर्यंत गाजलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणात परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने पहिल्यांदाच सर्वत्र चौकशीची थेट मागणी करण्यात आली होती.यांनतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेले गौण खनिजचे काम हे त्यांच्याकडून काढून घेत थेट जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी स्वतःकडे ठेवले आहेत. तसेच कुळ,इनाम जमिनी सुनावणीची प्रकरणे …

Read More »

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन विशेष, सिंचनाची श्वेतपत्रिका काढा-कारेमोरे

विश्व भारत ऑनलाईन : राज्यात सर्वाधिक धरणे मराठवाड्यात आहेत. येथे किमान दहा लाख हेक्टर जमिनीचे सिंचन होणे अपेक्षित आहे. मात्र, दाेन ते तीन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येते. फक्त कागदावरच. पाण्याअभावी शेतकरी आत्महत्याग्रस्त ठरलेल्या मराठवाड्याच्या सिंचनप्रश्नावर मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. मराठवाड्यात पाणी स्थिती …

Read More »

शेतकऱ्यांनो सावधान!बोगस सात-बारा ओळखा

विश्व भारत ऑनलाईन : 7/12 उतारा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा विषय आहे. मात्र, अलीकडच्या काळात बोगस सातबारा वापरून कर्ज उचलून जमिनीचा व्यवहार केल्याची प्रकरणं अनेकदा समोर येतात. बोगस सातबारा वापरून कर्ज घेतलं आणि नंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याची प्रकरणंही महाराष्ट्रात घडली आहेत.2 महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात अशीच घटना समोर आली.श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे बुद्रुक गावातील 7 जणांनी संगनमतानं शेतीचे बनावट सातबारा …

Read More »

ऊसतोड मुकदमाचे अडीच लाख पळविले

औरंगाबाद : बँकेतून काढलेले पैसे पिशवीत ठेवून मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवणे ऊसतोड मुकदमास चांगलेच महागात पडले आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील पिशोर येथे घडली. पिशोर येथील बस स्टॅन्ड समोर गाडी उभी करून लघुशंकेवरून येण्याच्या वेळेत चोरट्यानी पैशाची पिशवी पळविल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पिशोर नाक्यावरील एका खासगी बँकेतून अडीच लाख रुपये दशरथ राठोड व नारायण राठोड यांनी काढले. त्यांनतर ते लघुशंकेसाठी …

Read More »

शेतकऱ्यांसमोर ‘ई-पीक’ची डोकेदुखी 

नागपूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ई-पीक पेरा योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महसूल, कृषी विभागाची जबाबदारी असताना या योजनेची कामे शेतकऱ्यांनी करावी, असा आग्रह केला जातोय, असा दावा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. गत वर्षीपासून ई -पीक पेरा नोंदणी योजना सुरु केली. योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस सक्रिय

विश्व भारत ऑनलाईन : पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काल पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात मुंबई, नागपूर, अमरावती,पुणे, अकोला, कोल्हापूर जिल्ह्यातील परिसरात पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने आज विदर्भात यलो अलर्ट दिला आहे. …

Read More »

पाऊस रुसलेलाच, बळीराजा चिंतेत औरंगाबाद जिल्ह्यात बाप्पाचे जल्लोषात आगमन

औरंगाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून ३९ टक्के तूट आहे.२४ जून रोजी ५१.२ मिमी तर ४ ऑगस्टला ४७.५ मिमी, ७ ऑगस्ट रोजी २२ मिमी, १५ ऑगस्ट रोजी १०.५ पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ४८६.२ मिमी पावसाची नोंद आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. मात्र …

Read More »