Breaking News

शेतकऱ्यांसमोर ‘ई-पीक’ची डोकेदुखी 

Advertisements

नागपूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ई-पीक पेरा योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महसूल, कृषी विभागाची जबाबदारी असताना या योजनेची कामे शेतकऱ्यांनी करावी, असा आग्रह केला जातोय, असा दावा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

Advertisements

गत वर्षीपासून ई -पीक पेरा नोंदणी योजना सुरु केली. योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी यावर्षी ई-पीक योजना राबवली जात आहे. त्यामुळे ई-पीक पेरा नोंदणीची कामे शेतकऱ्यांंना करण्याचा आग्रह का? ही कामे शेतकऱ्यावर लादू नका अशी मागणी शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने निवेदनात केली आहे.

Advertisements

… तर मदतीपासून वंचित

ई – पीकपेरा नोंदणी करीता बहुतांश शेतकऱ्याकडे स्मार्ट मोबाईल नाही. त्यांना नोंदणी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी पीक पेरा नोंदविण्यापासून वंचित राहतील. आर्थिक, मानसिक व शारीरिकरित्या खचलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच पीक पेरा कसा भरावा,असा प्रश्न आहे.यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तहसील कें अजंता गुफाएं परिसर मे मधुमक्खियों के हमले से पर्यटक जख्मी

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तहसील कें अजंता गुफाएं परिसर मे मधुमक्खियों के हमले से पर्यटक …

पेंच टाइगर रिजर्व जोन में जंगल के राजा बाघ के हमले से युवक की मौत

पेंच टाइगर रिजर्व जोन में जंगल के राजा बाघ के हमले से युवक की मौत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *