Breaking News

शेतकऱ्यांसमोर ‘ई-पीक’ची डोकेदुखी 

Advertisements

नागपूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ई-पीक पेरा योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महसूल, कृषी विभागाची जबाबदारी असताना या योजनेची कामे शेतकऱ्यांनी करावी, असा आग्रह केला जातोय, असा दावा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

Advertisements

गत वर्षीपासून ई -पीक पेरा नोंदणी योजना सुरु केली. योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी यावर्षी ई-पीक योजना राबवली जात आहे. त्यामुळे ई-पीक पेरा नोंदणीची कामे शेतकऱ्यांंना करण्याचा आग्रह का? ही कामे शेतकऱ्यावर लादू नका अशी मागणी शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने निवेदनात केली आहे.

Advertisements

… तर मदतीपासून वंचित

ई – पीकपेरा नोंदणी करीता बहुतांश शेतकऱ्याकडे स्मार्ट मोबाईल नाही. त्यांना नोंदणी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी पीक पेरा नोंदविण्यापासून वंचित राहतील. आर्थिक, मानसिक व शारीरिकरित्या खचलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच पीक पेरा कसा भरावा,असा प्रश्न आहे.यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पेंच टाइगर रिजर्व जोन में जंगल के राजा बाघ के हमले से युवक की मौत

पेंच टाइगर रिजर्व जोन में जंगल के राजा बाघ के हमले से युवक की मौत …

डोंगरगढ़-खैरागढ रोड की झाडियों के पास मिली मृत तेंदुए की लाश

डोंगरगढ़-खैरागढ रोड की झाडियों के पास मिली मृत तेंदुए की लाश टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *