Breaking News

पाऊस रुसलेलाच, बळीराजा चिंतेत औरंगाबाद जिल्ह्यात बाप्पाचे जल्लोषात आगमन

Advertisements

औरंगाबाद : जिल्ह्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, जिल्ह्यात अजून ३९ टक्के तूट आहे.२४ जून रोजी ५१.२ मिमी तर ४ ऑगस्टला ४७.५ मिमी, ७ ऑगस्ट रोजी २२ मिमी, १५ ऑगस्ट रोजी १०.५ पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने दडी मारली होती.१ जून ते ३१ ऑगस्टपर्यंत एकूण ४८६.२ मिमी पावसाची नोंद आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. मात्र या महिन्यात पावसाचे दिवस कमी आहेत. चिकलठाणा परिसरात फक्त १७.३ मिमी पावसाची नोंद झाली.

Advertisements

……….

Advertisements

ढोलताशांचा गजर आणि पाऊस

ढोलताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करत भक्तांनी सकाळपासूनच बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. दुपारी ३ वाजेनंतर पावसानेही जोरदार हजेरी लावली.१५ ऑगस्टनंतर पाऊस गायब झाल्यामुळे खरीप पिकांची चिंता वाढली होती. पण, गणपती बाप्पा आपल्यासोबत रुसलेल्या वरुणराजालाही घेऊन आल्याने भक्तांचा आनंद द्विगुणित झाला. रात्री ८.३० वाजेपर्यंत ४१.१ मिमी पाऊस पडल्याची नाेंद एमजीएम वेधशाळेत झाली आहे. यापूर्वी ४ ऑगस्टला ४७.५ मिमी तर १५ ऑगस्ट रोजी १०.५ मिमी पाऊस पडला होता. गणेशोत्सवाच्या काळात दहाही दिवस कमीअधिक फरकाने पाऊस पडण्याचा आनंद हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, ग्रामीण भागातही पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत करणे हेच तुकडोजी महाराजांचे आत्म-समाधान 

कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदत करणे हेच तुकडोजी महाराजांचे आत्म-समाधान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   अमरावती. गुरुकुंज …

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तहसील कें अजंता गुफाएं परिसर मे मधुमक्खियों के हमले से पर्यटक जख्मी

छत्रपती संभाजीनगर : सोयगाव तहसील कें अजंता गुफाएं परिसर मे मधुमक्खियों के हमले से पर्यटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *