Breaking News

नागरिक त्रस्त : औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री कक्ष कधी होणार स्थापन?

नागरिकांना गावातून थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणे सोयीस्कर व्हावे, या उद्देशाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापनेचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयातील असा कोणताही स्वतंत्र मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन झालाच नाही. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवक -जावक विभागातच नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात आहेत, ही बाब समोर आली.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ जानेवारी २०२० रोजी सरकार गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करावा. त्यात येणाऱ्या तक्रारींचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी निपटारा करावा, असे म्हटले होते. त्यानुसार १६ डिसेंबर २०२२ रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यवाही झाली. हे कळाल्यावर सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे तक्रार दाखल करण्यासाठी गेले.मात्र,तेथे स्वतंत्र कक्ष स्थापन झालेला नाही. आवक -जावक विभागातच त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली. त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत ही फसवणूक असल्याचा सूर वरिष्ठांकडे व्यक्त केला.याकडे लक्ष न दिल्यास आंदोलन करू, असेही कारेमोरे यांनी निवेदनात नमूद केले.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात १०० कोटींच्या घोटाळ्यात भाजपच्या बड्या नेत्याचा भाऊ फरार

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपुरचे निवृत्त विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष …

नागपूर जिल्ह्यात वाळू माफियांचा हैदोस : महसूल, पोलीस अधिकाऱ्यांचे संबंध कारणीभूत

अवैध वाळू उत्खनन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, नागपूरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वाळू माफियांचे प्राबल्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *