अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसलेला बांगलादेशी होता. सैफ व्यवस्थित चालत येत होता. त्यामुळे सैफवरील हल्ला संशयास्पद आहे. त्याने स्वत:च चाकू मारून घेतला की काय,अशी शंका आहे.
सैफ अली खान, नवाब मलिक, शाहरूख खानचा मुलगा यांच्याबाबत काही झाले, तरच अनेकांना पुळका येतो. काही जण पुढे येतात. मात्र, सुशांतसिंगच्या आत्महत्येवर त्या गप्प असतात. हिंदू अभिनेत्यांवरील, कलाकारांवरील हल्ल्यानंतर काही बोलत नाहीत. बांगलादेशी अगोदर नाक्यावर उभे राहत होते. आता घरात घुसायला लागले आहेत. भारताला इस्लाम राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ‘जय श्रीराम’ म्हणणाऱ्यांच्या घरात घूसून मारण्याचे प्रकार घडले. हिंदू समाज म्हणून एकत्र राहून जशास तसे उत्तर देण्याची गरज आहे.
‘प्रत्येक हिंदूच्या आयुष्यात अयोध्येत राम मंदिर पाहायला मिळाले, हा मोठा क्षण आहे. जे आपल्या हक्काचे आहे, ते घेणारच, हे या दिवसाचे महत्त्व आहे,’ असे ते म्हणाले. ‘हिंदू राष्ट्रात धर्मस्थळावर अतिक्रमण केले जाते. प्रमुख धर्मस्थळावर वक्फ बोर्डाने ताबेमारी सुरू केली आहे. भविष्यात अन्य हिंदू मंदिराकडेही वाकड्या नजरेने पाहतील.
सर्वधर्म समभाव ही नाटके केवळ हिंदू समाजासाठी आहेत. ईद, मोहरम, चर्चमधील कोणत्याही कार्यक्रमात हिंदूंनी अडथळे आणले नाहीत. पण, गणपती, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगड मारण्याची हिंमत का होते? ‘सेक्युलर’ हा शब्द राज्यघटनेत नाही. भारत देश हिंदू राष्ट्र आहे. येथे पहिले हिंदूंचे हित पाहिले जाईल. देशात, राज्यात हिंदूंचे सरकार आहे. गोरक्षकाला त्रास देणारा घरी सुखरूप जाणार नाही, याची काळजी पोलीस घेतील. कीर्तनकार सातत्याने हिंदुत्वावर बोलत असतात. त्यांच्या वाणीत समाज घडवण्याची मोठी ताकद असते. त्यामुळे कीर्तनकारांनी हिंदू धर्माचे प्रबोधन करावे. अभिनेता सैफ अली खान सर्वाना उल्लू बनवत आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. तर करीना कपूरमुळे सैफवर हल्ला झाल्याची चर्चा मुंबईत आहे.