Breaking News

नागपूर : 872 ट्रक रेतीची चोरी; तहसीलदार रडारवर

जीपीएससारखी अत्याधुनिक यंत्रणा तैनात असतानाही नागपूर जिल्ह्यातील रेतीघाटांवरून तब्बल 872 ट्रक रेतीची चोरी झाली आहे, अशी धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासात समोर आली आहे.

रेतीचोरी थांबविण्यासाठी प्रशासन अनेक प्रकारचे प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून घाटांवर जीपीएस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या कामाचे कंत्राट शौर्या इन्फोटेक या कंपनीला देण्यात आले आहे.रेतीची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक ट्रकची माहिती ते गोळा करतात आणि कोणत्या घाटावरून कोणता ट्रक रेती घेऊन गेला, याच्या माहितीचा संदेश तहसीलदारांच्या मोबाइलवर जातो. तरीही इतकी मोठी चोरी कशी झाली, हा आश्चर्याचा विषय आहे.रेतीतस्करांचे रॅकेट समूळ नष्ट करण्याचा चंग सरकारने बांधला आहे. तस्करांविरुद्ध पाश आवळण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुन्हेशाखेचे विशेष तपास पथक स्थापन केले. पथकाने सखोल तपासाला सुरुवात केली. रॅकेटचा सूत्रधार कुख्यात गुड्डू खोरगडेला अटक केली. त्याच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धेतीचीही कारवाई करण्यात आली.या प्रकरणातील गुंतागुंतीचे धागे उलगडण्यासाठी तपास पथकाने शौर्या कंपनीला माहिती मागविली. गुरुवारी ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला.या प्रकरणात तहसीलदारांना एसएमएस मिळत असतानाही तहसीलदारांनी कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आता हे तहसीलदारही पोलिसांच्या रडारवर आले असून, वेळ पडल्यास पोलिसांकडून तहसीलदारांविरुद्ध कारवाई करण्याची दाट शक्यता आहे.872 ट्रकमधून एका वर्षामध्ये कोट्यवधीची रेती चोरी झाल्याचा अंदाज तपास पथकाला आहे. याप्रकरणात तहसीलदारांची नेमकी भूमिका काय, त्यांनी नियमाचे पालन केले किंवा नाही, याचा सखोल तपास करण्यात येईल.

About विश्व भारत

Check Also

महिला सरपंचाने स्वतःला गाडले जमिनीत!तहसीलदार…!

कुणी अन्यायाविरुद्ध आंदोलन केले तरी तिकडे लवकर शासकीय यंत्रणा ढुंकूनही पाहत नाही, अशी परिस्थिती सगळीकडे …

तहसीलदार प्रकाश व्हटकर निलंबित : खळबळ

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील कढोली (खुर्द)ग्राम पंचायत सरपंच आणि दोन सदस्य अपात्र झाल्यानंतर त्यांच्या अपिलाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *