हिंमत असेल तर उद्धव ठाकरेनी सरकार पाडून दाखवावे, आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. माझ्या डोक्यात आजही मुख्यमंत्रीपदाची हवा गेलेली नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर हाताच्या रेषा दाखवायची आम्हाला गरज नाही, मनगटात ताकद आहे ती दाखवायची ताकद आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही मंदिरात जायला घाबरत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांनाही उत्तर दिलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घडलेले मोठे-मोठे शिवसैनिक आज आपल्यासोबत आहेत. गजानन किर्तीकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ अशा ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला. सीमा प्रश्नावरून वातावरण तापलेलं असताना त्यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.