Breaking News

Maharashtra Unseasonal Rain | नंदुरबारमध्ये वादळी पावसाने बाजारपेठ उध्वस्त : जनावरांचाही मृत्यू

Maharashtra Unseasonal Rain विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्याने आणि पावसाने थैमान घातल्याने पीक व बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले. नवापूर आणि नंदुरबार येथे वीज पडून चार जनावरांचा मृत्यू झाला, तर काही ठिकाणी झाडे कोसळले व घरांचे पत्रेही उडाले.




तळोदा अक्कलकुवा धडगाव आणि नंदुरबार या तालुक्यांमध्ये आज सोमवार 6 मार्च रोजी दुपारी तीन ते पाच वाजताच्या दरम्यान धुळीच्या वादळासह अचानक आलेल्या पावसाने मोठे थैमान घातले. Cloudy weather होळी सणानिमित्त नंदुरबार नवापूर तळोदा अक्कलकुवा धडगाव या प्रत्येक तालुक्यातालुक्यातील प्रमुख गावांमध्ये बाजारपेठा सजलेल्या होत्या. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल घडत असते. परंतु आज ऐन होळीच्या दिवशी प्रचंड धुळीचे लोट आणि सोसाट्याचा वारा यामुळे एक ठिकाणच्या बाजारपेठा जवळपास उध्वस्त झाल्या. अवकाळी पावसामुळे मांडलेली दुकाने आवरताना आणि विक्रीचे सामान वाचवताना एकच धावपळ उडाली. #MumbaiRains #MumbaiWeather




वीजेने जनावरांचा मृत्यू

अक्कलकुवा तालुक्यातील प्रसिद्ध काठी येथील तसेच नंदुरबार मधील होलिकोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरले. प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार गारपीट झाल्याचे अद्याप माहिती नाही तथापि पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली जात आहे. नवापूर तालुक्यात वीज पडून एक म्हैस दगावली. नंदुरबार तालुक्यात कंढरे गावात वीज पडून तीन जनावरांचा मृत्यू झाला. Maharashtra Unseasonal Rain




About विश्व भारत

Check Also

नागपूर मेट्रो स्टेशनला आग : प्रवासी..!

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नागपुरातील महामेट्रो स्थानके सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी …

जनता का भविष्य तबाह करने में BJP की नई शराब क्रांति

जनता का भविष्य तबाह करने में BJP की नई शराब क्रांति   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *