उष्मा आणि मान्सूनचे उशिराने आगमन याचा फटका बसला असून टमाटर उत्पादनात घट झाली आहे. परिणामी बाजारात टोमॅटोचा तुडवडा निर्माण होऊन दर वाढले आहेत. कोलकात्यात टोमॅटोचा दर प्रति किलो १४८ रुपये, मुंबईत सर्वात कमी ५८ रुपये आहे. दिल्ली आणि चेन्नईमध्ये टोमॅटोचा दर अनुक्रमे ११० रुपये किलो आणि ११७ रुपये आहे.
देशातील बहुतांश भागात टोमॅटोचा दर प्रति किलो १५० रुपये पार झाला आहे. देशातील अनेक भागांत हीच स्थिती आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये टोमॅटोचा दर प्रति किलो १५० रुपयांवर गेला आहे. टोमॅटोसह अन्य भाजीपाल्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारने हस्तक्षेप करून भाज्यांचे दर नियंत्रणात ठेवावेत, असा सूर ग्राहक व्यक्त करत आहेत. नागपुरात 150 रुपयापेक्षा जास्त किलोने टमाटर मिळत आहे.