महाराष्ट्राचा महानालायक कोण?
यासंदर्भात स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला केला. देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्ली जाण्याचा शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेला नाही, असा दावा उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत केला. त्याला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आधी देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावत उद्धव ठाकरेंवर टीका केली तर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे.