Breaking News

आजपासून राज्यातील 7/12 उतारे बंद : शेतकरी अडचणीत

१९ जुलै ते २२ जुलै दरम्यान भूमी अभिलेख विभागीय ऑनलाईन पोर्टल तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत करण्यात येणार असल्याने भूमी अभिलेख विभागाचे सर्व पोर्टल बंद राहणार आहेत. परिणामी तीन दिवसाच्या काळात सातबारा उतारा, मिळकत पत्रक, फेरफार उतारे ऑनलाईन डाउनलोड करता येणार नाहीत अशी माहिती ई-फेरफार प्रकल्पाच्या राज्य समन्वयकानी दिली. सध्या ई-पीक पाहणी, खरीप पीक विमा योजना तसेच अन्य योजनांसाठी शेतकरी अर्ज करत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे १९ जुलैपूर्वीच काढावीत. जेणेकरून अर्ज करताना अडचण येणार नाही. २३ जुलैपासून सर्व पोर्टल पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील.

About विश्व भारत

Check Also

मुख्यमंत्री ने किसानों को दिए अतिवर्षा और बाढ़ से मृत्यु पर 4-4 लाख

मुख्यमंत्री ने किसानों को दिए अतिवर्षा और बाढ़ से मृत्यु पर 4-4 लाख टेकचंद्र सनोडिया …

महायुति में ‘लाड़ली बहन योजना’ का श्रेय लेने मची होड़

महायुति में ‘लाड़ली बहन योजना’ का श्रेय लेने मची होड़ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *