Breaking News

चहा उकळून पित असाल तर आजच थांबवा : चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती?

Advertisements

भाऊ चहा घ्या ना… नाही असू द्या, ऍसिडिटी होते. थोडा-थोडा, कट तरी घ्या…! चहा हे सर्वांच्याच आवडीचं पेय. चहा अनेकांना आवडतो. भारतात एक कप चहाने भारतीयांची दिवसाची सुरुवात होते. चहा जास्त उकळला तर आणखी चविष्ट वाटतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का, उकळलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक असतो? न्यूट्रिशनिस्ट सुमन अग्रवाल यांनी आपण चुकीच्या पद्धतीने चहाचे सेवन करतो असे सांगितले. त्या म्हणाल्या, “चहा उकळण्याऐवजी ब्रू करून प्यावा.”

Advertisements

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्रू चहा म्हणजे नेमकं काय? ब्रू चहा तयार करताना गरम पाण्यात चहा पत्ती टाकावी आणि तीन मिनिटांमध्ये चहाची चव आणि सुगंध येते.

Advertisements

सुमन अग्रवाल पुढे सांगतात, “चहा असा पदार्थ आहे, जो सर्व भारतीयांना आवडतो. खूप जास्त उकळलेल्या मसाला चहामध्ये खूप जास्त टॅनिन असते, पण त्याबरोबरच त्यात अनेक हानिकारक घटक असतात. त्यापैकी एक म्हणजे अॅक्रिलामाइड. अशा चहाचे दीर्घकाळ सेवन इतके हानिकारक ठरू शकते की कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. उकळलेला मसाला चहा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यायला पाहिजे.”

त्या सांगतात, “गरम पाण्यात चहा पत्ती टाका आणि तीन मिनिटांमध्ये या चहा पावडरची चव गरम पाण्यात उतरते. चहाचे सेवन करण्याचा हा सर्वसामान्य प्रकार आहे.”

खरंच चहा उकळून पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का?

बॅलेंस्ड बाइटच्या संस्थापक न्यूट्रिशनिस्ट अपेक्षा चांदूरकर, सांगतात, ” चव आणि आरोग्याचे फायदे टिकवून चहा उकळून नाही तर ब्रू करून प्यावा.”चांदूरकर सांगतात, “चहा ब्रू करणे म्हणजे योग्य तापमानात चहा पावडर गरम पाण्यात उकळू न देता मिक्स करणे होय. कारण जर चहा पावडर पाण्यात उकळून घेतली तर चहा कडू होतो, त्यातील काही रासायनिक घटक नष्ट होतात.”चांदूरकर पुढे सांगतात, “मसाला चहा जर खूप जास्त उकळत असाल तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.”

चांदूरकर यांनी चहाचे तापमान सांगितले आहे. काळ्या चहाचे योग्य तापमान सुमारे २००-२१२°F (९३-१००°C) असते, तर कडू चव टाळण्यासाठी ग्रीन टीचे तापमान १६०-१८०°F (७१-८२°C) असावे.हर्बल चहा तयार करताना पाणी किती प्रमाणात उकळावे हे प्रकारानुसार अवलंबून आहे. चहाची चव टिकवण्यासाठी चहा पावडर योग्य प्रमाणात टाकणे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही चहाची चव वाढवण्यासाठी त्यात दूध, साखर आणि लिंबू मिसळू शकता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून …

उशी ठरतेय मान-डोकेदुखीचं कारण

शांत झोप प्रत्येकासाठी आवश्यक असते. पण जर तुम्हाला सकाळी उठल्यावर मानेमध्ये जडपणा, खांदेदुखी, डोकेदुखी किंवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *